राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम.एस.) या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात विवेकानंद विद्यालयातील इयत्ता आठवीच्या एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
गुणवत्ता यादीत निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे
१) नक्षत्र बाळकृष्ण कापुरे २) वासुदेव यशवंत जाधव ३) सौम्या अरुण पाटील ४) सौम्या जुगल किशोर पाटील ५) गौरव दिलीप माळी ६) गौरव जितेंद्र चौधरी ७) लावण्या सचिन पाटील८) चंद्रेश अनिल शिरसाट ९) भूषण संतोष पाटील १०) जिग्नेश अतुल चौधरी ११) गितेश ज्ञानेश्वर पाटील १२) दिवेश चंद्रशेखर कंखरे १३) दिव्येश रमेश चौधरी १४) रुद्र किरण पाटील १५) दुर्गेश किशोर पाटील
डिसेंबर महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला १००० रु. याप्रमाणे वर्षाला १२०००रु. शिष्यवृत्ती प्राप्त होते. यातील प्रत्येक यशस्वी विद्यार्थी हा इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षात एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. विद्यालयातील उपशिक्षक पवन लाठी यांनी या परीक्षेचे कामकाज पाहिले.
या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या आईबाबांचे, कुटुंबियांचे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनःश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक नरेंद्र भावे,शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद व पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment